मी कोणाला कळलो नाही !
मित्र कोण आणि शत्रू कोण हे गणित कधी जमलेच नाही, नाही भेटला असा कोण, ज्याने मला छळले नाही, सुगंध सारा वाटीत गेलो, तरी कधी दरवळलो नाही, ऋतू नाही असा कोणता, ज्यात मी होरपळलो नाही, केला सामना वादळाशी, त्या पासून कधी पळालो नाही, सामोरे गेलो संकटांना, त्यांना पाहून कधी वळालो नाही, पचविले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही, आले जीवनात दुःख किती कधीच मी हरलो नाही, कधीच न सोडली कास सत्याची कधी मी मळलो नाही, रुसून राहिले अगदी माझ्या जवळचे,
मी कोणालाच कळलोच नाही... मी कोणालाच कळलोच नाही...
निःशब्द.. !!
महाराष्ट्राच्या राजकारणातली अंधारमय सकाळ.. !!
.jpg)

Post a Comment
0 Comments