ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर
जिल्हा परिषद, ठाणे येथे लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती दि. ०१ ऑगस्ट, २०२५ रोजी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सामाजिक न्याय, समता व संघर्षाचे प्रतीक असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी जिल्हा परिषद ठाणेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, कार्यकारी अभियंता प्रकाश सासे तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या क्रांतिकारी साहित्याच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी वर्गाच्या व्यथा व वेदना शब्दबद्ध करून सामाजिक परिवर्तनाची मशाल पेटवली. त्यांच्या लेखणीतून फुललेले लोककथांचे पात्र, “फकिरा” सारखी कादंबरी आजही प्रेरणादायी आहे.
या प्रसंगी उपस्थितांनी अण्णाभाऊंच्या विचारांची उजळणी करत, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समता व न्यायाच्या मूल्यासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प केला. त्यांच्या साहित्य व समाजसुधारणेतील योगदानाचे स्मरण करून उपस्थितांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्यातर्फे करण्यात आले.
000
Post a Comment
0 Comments