घराघरात आठ डबे ? केडीएमसीचा गोंधळात टाकणारा फतवा ! नागरिकही चक्रावले
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कारभारामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या कल्याण डोंबिवलीकरांना पालिकेच्या घनकचरा विभागाने काढलेल्या नव्या फतव्याने पुन्हा वेठीस धरण्यात आले आहे. पालिकेचे घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांनी कचऱ्याच्या वर्गवारीनुसार आठवड्याचे वार घरगुती कचरा संकलनासाठी लावून दिले आहेत. त्यामुळे कोणता कचरा कोणत्या दिवशी पालिकेच्या गाडीत स्वीकारला जाईल याचे वेळापत्रक पालिकेने जारी केले आहे. ठेकेदाराच्या सोयीसाठी पालिका प्रशासन अशा प्रकारे सर्वसामान्य कल्याण डोंबिवलीकरांना वेठीस धरत आहे असा आरोप सर्वसामान्य नागरिक करत आहेत. त्यामुळे त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेचे हे नवीन कचरा संकलन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
आठवड्यातील कचरा संकलनाचे नियोजन
सोमवार - प्लास्टिक व प्लास्टिकच्या बाटल्या
मंगळवार - कपडे फर्निचर व गाद्या
बुधवार- कागद वह्या पुस्तके
गुरुवार - प्लॅस्टिक आणि प्लास्टिकचे भंगार
शुक्रवार - ई कचरा धातूचा कचरा तसेच स्वयंपाक घरातील टाकाऊ वस्तु
रविवार - कागद व जुनी पुस्तके.
पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने हे स्पष्ट केले आहे की घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी दररोज घराघरातून कचरा संकलन करत असले तरी वरील वेळापत्रकानुसार आठवड्याच्या ठराविक दिवशी कल्याण डोंबिवलीकरांनी वरील प्रमाणे विशिष्ट कचरा प्रकार वेगळा करूनच द्यायचा आहे. पूर्वी संकलन न झालेल्या किंवा मिश्र कचऱ्यामुळे अडचणी निर्माण होत असल्याचे कारण पालिकेने दिले आहे. याशिवाय कल्याण डोंबिवलीकर घरगुती ओला आणि सुका कचरा ठरलेल्या दिवशी आधीपासूनच वेगळा करून देत आहेत.
कल्याण डोंबिवली पालिकेने स्पष्ट केले आहे की ठरलेल्या वेळापत्रकानुसारच कचरा द्यावा अन्यथा कचरा संकलन केले जाणार नाही नागरिकांनी सहकार्य न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील पालिकेने दिला आहे. कचरा वर्गीकरणात नागरिकांचा सक्रिय सहभाग हाच शहराच्या स्वच्छतेचा पाया आहे अशी मुक्ताफळे देखील पालिकेने उधळली आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण दहा प्रभाग क्षेत्र कार्यालय आहेत त्यामध्ये प्रभाग अ ब आणि क या तीन प्रभाग क्षेत्रात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत कचरा संकलन केले जाते तर उर्वरित चार जे ते दहा इ या सात प्रभागांमध्ये खाजगी ठेकेदारामार्फत कचरा संकलन केले जाते. या कचरा संकलनासाठी ठेकेदाराला प्रतिवर्षी 88 कोटी प्रमाणे आगामी दहा वर्षे कल्याण डोंबिवली पालिका मोबदला अदा करणार आहे. मात्र कचरा संकलनाच्या तसेच स्वच्छतेच्या मोहिमेत स्थानिक पातळीवर महिला बचत गटांना रोजगाराच्या प्रवाहात आणण्यात येणार होते तथापि पालिकेने केलेल्या खाजगीकरणात महिला बचत गट मात्र दुर्लक्षित राहिले आहेत.
तर या फतव्यानुसार मनपा कडे कचरा संकलनासाठी गाड्याचे काय नियोजन आहे. असा सवाल यानिमित्ताने करीत या संदर्भात केडीएमसी आयुक्त यांना माजी नगरसेवक मोहन उगले यांनी पत्र दिले असून आता वारानुसार कचर्याचे डबे घरात साठवून ठेवयाचे का?असा खडा सवाल यानिमित्ताने सर्वसामान्य करदात्याना ठाकला असल्याने प्रशासनावर रोष होत आहे.
.jpg)



Post a Comment
0 Comments