बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती देण्याच्या मागणीसाठी कल्याणमध्ये निघाला भव्य मोर्चा
ब्राह्मणी कर्मकांडापासून बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्त करण्याची मागणी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
बुद्धगया महाबोधी महाविहार हे अखिल विश्वातील बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असून ब्राह्मणी कर्मकांडापासून मुक्त करून बौद्ध भिक्षू संघाच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी जगभरातील बौद्ध अनुयायांनी बुद्धगया येथे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बुद्धभूमी फाउं
यावेळी बुद्धभूमी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष भंते गौतमरत्न महाथेरो, भंते प्रियरत्न थेरो, भंते शक्यरत्न थेरो, भंते तुशीतरत्न थेरो,भंते विनयरत्न,भंते इंद्ररत्न, भंते यामरत्न,भंते नंदरत्न,भंते शिलरत्न यांच्या प्रमुख उपस्थित मोर्चाला सुरवात करण्यात आली. कल्याण पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून निघालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसदिलदार कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदार कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनास बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण पूर्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र कल्याण पूर्व, भारतीय बौद्ध महासभा कल्याण, बौद्ध विहार संघटना समन्वय समिती, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पार्टी, आझाद समाज पार्टी (भीम आर्मी) दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कल्याण सिटी संघटनांनी याआंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून ठाणे जिल्हा सह मुंबई परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती ठाणे जिल्हा सर्वासर्वे, बुद्धभूमी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष भंते गौतम रत्न महाथेरो यांनी राज्य सरकार व केंद्र सरकार कडे मागणी केली आहे, की बुद्धगया महाबोधी महाविहार हे ब्राह्मणी कर्मकांडापासून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे. बुद्धगया टेम्पल ॲक्ट कलम १९४९ रद्द करावे, ब्राह्मणी पंडे पुरोहिताच्या हस्तक्षेपावर बंदी घालावी व बौद्धांच्या भावना दुखावणाऱ्या पुरोहितांवर कायदेशीर कारवाई करावी. महाबोधी महाविहार येथे केवळ बौद्ध धम्मानुसार धार्मिक विधी पार पाडले जावेत या मागण्या करण्यात आल्या.
.jpg)



Post a Comment
0 Comments